सकाळी ऑफिसला जातांना वाटेत पाऊस सुरु झाला..पाऊस तसा रिम-झिम च होता....पण कपडे ओले होतील या धाकानं.....मी एका शाळेच्या आडोश्याला उभा राहिलो..... पण काही मिनिटातच पावसानं जोर धरला...आणी..मी शाळेच्या व्हऱ्यांड्यात उभा राहिलो......बाहेर धो धो बरसणारया पावसाचा आवाज एकत् उभं असलेलं माझं मन......क्षणार्धात शाळेच्या किलबिलाटा कडे ओढलं जावू लागलं.....शाळेच्या वर्गा-वर्गातून येणारा आवाज मला हळू हळू.....भूत काळाकडे ओढत होता.....कुठे ''बे-एक-बे चे पाढे ''.... तर कुठे ''श्रावण मासी हर्ष मानसी'' ची कविता....तर कुठल्या तरी वर्गात मुलांचा नुस्ता ''कल्ला'' मला उभ्यानच माझ्या बालपणात घेवून जात होता.....मनात आठवणींचा गोंधळ आणी शरीरावर डोक्यावरून पडणाऱ्या पावसाच्या थेंबानी..मी.......हरखून गेलो होतो......वर्गातून येणारा आवाज....शिक्षकांचे ओरडणे....मधेच टाळ्यांचा आवाज.....भूतकाळाच्या या....जंजाळात...अडकतो न अडकतो....तोच....अचानक भानावर आलो.......शाळेची घंटा घणघणत होती.......कदाचित मधली सुट्टी झाली होती.....अचानक...सगळ्या वर्गातून.....पक्ष्यांचे थवे च्या थवे उडावे तसे विद्यार्थी बाहेर येवू लागले..... क्षणार्धात सारा व्हरांडा मुलांनी गजबजून गेला......कोणी इकडे पळतोय तर कोणी तिकडे .....बहुतेक मधल्या सुट्टीत ''डबा'' खायची लगबग असणार त्यांना......माझ्या भोवती हि काही मुलांनी गराडा घातला ....मी मुद्दामच थोडा बाजूला सरकून उभा राहिलो......काही मिनिटातच संपूर्ण व्हरांडा हा मांडीवाळून अन गटा गटानं बसलेल्या मुला मुलींच्या घोळक्यांनी भरून गेला.....माझ्या शेजारीच ४-५ मुलांनी अंगत पंगत सुरु केली होती...कदाचित ४-५वी तील मुलं असतील....?? पटापट...पायांनच बसायची जागा साफ केली......आप आपले चप्पल बूट बाजूला काढून मांडी मारून बसली....प्रत्येकान आपल्या जवळील डब्बा हातात आणला होता, सगळ्यांनी आपले डब्बे उघडले.......डब्ब्या-डब्या तील ''खाऊ'' चा खमंग वास मला पुन्हा बालपणा कडे घेवून जात होता........निरागस -निष्कपट अन सहज असलेलं बालपण आणी बालपणातील 'मैत्री' या डब्ब्या तील 'खाऊ'तूंनच सुरु होते अन कदाचित ती चिरकाल टिकतेही.....निदान स्मरणात तरी नक्कीच राहते...
रविवार, २९ सप्टेंबर, २०१३
गाव सोडताना..
अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी हे माझे गाव. दूध-दुभत्याची समृद्धी, उसाची शेती असं माझं गाव अगदीच रमणीय. पंचक्रोशीतला सगळ्यात मोठा आठवडे बाजार आमच्या गावी असतो. माझ्या जन्माच्या आधीच आम्ही गावातला वाडा सोडून मळ्यातल्या घरात राहायला गेलो होतो. तिथं आंब्याच्या आणि लिंबाच्या सावलीत छोटंसं घर बांधलं. घरासमोर गाई-गुरांचा मोठा गोठा, पक्ष्यांचा अखंड किलबिलाट, आंब्याला लागलेले पाड अशा कितीतरी गमती तिथं मिळाल्या. सोबतची भावंडं आणि मित्रांसोबत सूरपारंब्या, कोया, गोट्या, सागरगोटे असे अनेक डाव रंगायचे. सायकलीवर शिर्डीला साई बाबाच्या दर्शनाला मित्रांबरोबर जाने, ऊन्ह-पाऊस झेलत पांदीच्या वाटेवरून अनवाणी पायानं शाळेला जाणं, पाय धुऊन प्रार्थनेला उभं राहणं, मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर उस खाण्याची चढाओढ लावणं, कबड्डीच्या स्पर्धेत भाग घेणे.. असे कितीतरी आनंदक्षण शाळेनं ओंजळीत दिले.
रविवारच्या बाजारात भाजी विकायला मी आईसोबत जायचो. तिथं दोन रुपयाची रुपयाची शेव आणि पेढा घेतला की होणारा आनंद अमूल्य असायचा. महेश्वारच्या आणि महादेवाच्या मंदिरातील धमाल, गणेशोत्सवातील पूजा आणि ओहोळाच्या पाण्यात त्याचं विसर्जन, नवरात्रात पहाटे देवीच्या दर्शनाला चालत जाणं म्हणजे तर मजाच मजा असायची.. शेतांच्या बांधावरून येता-जाताना मोहरी आणि सूर्यफुलाच्या सुवासानं मन मोहरून जायचं. वाऱ्यावर डोलणारी पिवळीधमक फुलं पाहताना प्रसन्न वाटायचं. अंगणातलं तुळशीवृंदावन आणि सदाफुली, दुथडी भरून वाहणारी गोदावरी नदी, उसाची आणि द्राक्ष्याची शेत, देवळं हे सारं डोळ्यापुढून हटत नाही. आता हे सगळंच आठवणीत जाऊन बसलं आहे! पुढे उच्यशिक्षण घेण्यासाठी गाव सोडण्याची वेळ आली तेव्हा माझं पाऊल तिथून निघत नव्हतं. निरोप घेताना आवंढा दाटून आला होता...
सुहास कोळपे
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

